kalyan

कल्याण लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान, फटका कोणाला? 

कल्याण – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात काल सोमवार, २० मे ला मतदान झालं. 7 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशासह 49 लोकसभा मतदारसंघात मतदान पूर्ण झालं. महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघात या टप्प्यात मतदान झालं. दरम्यान, मिळालेल्या आकडेवारीनुसार राज्यात सरासरी ५३.३४ टक्के मतदान झालं आहे. यामध्ये दिंडोरीत सर्वाधिक मतदान ६१.९७ टक्के मतदान झाले आहे तर कल्याणमध्ये ४६.१० टक्के मतदान झाले.

त्यामुळे कल्याणमधील कमी मतदानाचा फटका आता कोणाला बसणार? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. 

तसे पाहता कल्याण लोकसभा मतदारसंघात महविकास आघाडी आणि महायुतीचे बलाढ्य उमेदवार रिंगणात होते. आणि इतर अपक्ष उमेदवार देखील रिंगणात होते. या अपक्ष उमेदवारांचा प्रभाव एवढा पडला नसला तरीहि हे उमेदवार आपली शक्ती पणाला लावून रिंगणात उतरले होते.

परंतु यंदा कल्याण लोकसभा मतदारसंघातील राजकीय पुढाऱ्यांवरती मतदार नाराज असल्याचे कालच्या टक्केवारीवरून दिसून आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ इतका महत्त्वाचा मतदारसंघ असूनही सर्वात कमी मतदान याठिकाणी झाले. शिवाय काल काही ठिकाणी मतदारांची नावे देखील मतदार यादीत नसल्याचे समोर आले आहे. तसेच काही ठिकाणी तर संथगतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. त्यामुळे याचा फटका देखील मतदानाला बसला.

दरम्यान, कल्याण लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाल्यामुळे आता याचा फटका नेमका कोणत्या उमेदवाराला बसणार? आणि कोणता उमेदवार जिकणार? अशी चर्चा सुरु झाली आहे. तसेच कल्याण लोकसभेचा भावी खासदार कोण होणार? अशी उत्सुकता नागरिकांमध्ये काल मतदान संपल्यापसून निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page