डोंबिवली

डोंबिवली स्कायवॉकवर धोकादायक इमारतीचा भाग कोसळला…

dombivali – डोंबिवली पश्चिम ‘ह’ प्रभाग क्षेत्रातील रेल्वे स्टेशनजवळील स्कायवॉकवर धोकादायक इमारतीचा भाग कोसळला. रेल्वे स्कायवॉकला लागून असलेली एक तीन मजली जुनी आणि धोकादायक इमारत पाडण्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला. यात स्कायवॉकचे छप्पर आणि लोखंडी रॉडचे मोठे नुकसान झाले आहे. विकासकांच्या निष्काळजीपणामुळे हि घटना घडली. सुदैवाने, त्यावेळी स्कायवॉकवर गर्दी कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, ऐन सणासुदीच्या काळात डोंबिवलीत फार मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर रहदारी असते. खरेदीच्या निमित्ताने चालत जाणाऱ्या लोकांची गर्दी असते अशावेळी निष्कासनाची कारवाई करत असताना रेल्वे स्टेशन जवळील स्कायवॉक अगोदरच बंद करणे अपेक्षित होते, परंतु विकासकाने या स्कायवॉक वरून येणाऱ्या जाणारे, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या जीवाची पर्वा करता इमारत पाडण्याचे काम सुरू केले. सुदैवाने, त्यावेळी स्कायवॉकवर गर्दी कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु यात कोणाचा जीव गेला असता तर याला जबाबदार कोण? प्रत्येकवेळी महापालिकेचा हलगर्जीपणा, गलथान कारभार समोर आला आहे. आता तर केडीएमसी कोणाच्याहि जीवाची पर्वा न करता बिनधास्त इमारत पाडण्याचे काम करत आहे. याकडे आयुक्त, उपायुक्त, ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकार्यांचा लक्ष आहे नाही? कि त्यांच्या परवानगीने हि कामे होत आहेत.

इतका मोठा अपघात होऊनही विकासकांनी अर्धी इमारत तशीच सोडून दिली आहे. तसेच केडीएमसी अधिकाऱ्यांनी देखील यावर कोणतीही कारवाई न करता केवळ दुरुस्तीचे आदेश दिले आणि स्कायवॉक प्रवासासाठी सुरूच ठेवला. त्यामुळे जर भविष्यात जर अशी घटना पुन्हा घडली तर त्याला जबाबदार कोण? कोणती जीवितहानी झाली तर गुन्हा दाखल होणार का?  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page