मुंबई
दस्त नोंदणी तीन दिवस बंद राहणार…

mumbai – राज्यातील नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येत आहेत. यामुळे 14 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12 वाजेपासून ते 17 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत ‘आय-सरीता’ प्रणाली अंतर्गत दस्त नोंदणीसह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहणार आहे.
संबंधित पक्षकार आणि दस्त नोंदणी करणारे व्यावसायिक यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), महाराष्ट्र राज्य, पुणे उदयराज चव्हाण यांनी केले आहे.