मानपाडा रोडवरील रस्त्यांची दुरावस्था, केडीएमसी महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष…

dombivali – मानपाडा रोडवरील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहन चालवताना त्रास होत आहे. चक्की नाका, सिमेंट रोड, कल्याण शीळ रोड, सुयोग हॉटेल, सोनारपाडा अशा अनेक ठिकाणी पावसाळा सुरु होण्यापूर्वीच खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक खाली वर झाले आहेत. रस्त्यात चढ उतार आहेत एका बाजूल पाणी साचून त्याठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. रस्त्यांच्या मधोमध खड्डे आहते. काही ठिकणी ड्रेनेजचे चेंबर तुटलेले आहेत. त्यामुळे गाड्या घसरत आहेत, अपघात होत आहे. एक महिला देखील गाडी घसरून पडली होती. शिवाय यामुळे त्याठिकाणीची वाहतूकही संथ गतीने चालू असते. चालत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वी रस्त्यांची समस्या मांडली जाते. याबाबत वेळोवेळी तक्रार देण्यात आली आहे. तरीही कल्याण डोंबिवली महानगरपालिका जाणीवपूर्वक रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यांना जागोजागी असणारे रस्त्यांचे खड्डे, भेगा, होणारी वाहतूक कोंडी, तुटलेले चेंबर दिसत नाहीत का? कल्याण शीळ, मानपाडा रोड हा कल्याण डोंबिवली ठाणे नवी मुंबई अंबरनाथ बदलापूर अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. त्यामुळे याठिकाणी २४ तास रहदारी असते.
मोठ्या प्रमाणात याठिकाणहून शाळेच्या बस, ट्रक, जड वाहन ये-जा करत असतात. त्यात या रत्यावर मेट्रोचे कमी चालू आहे. त्यामुळे अशा दुरावस्था झालेल्या रस्त्यांवर जर काही मोठा अपघात घडला, काही जीवितहानी झाली तर याची जबाबदारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका घेणार का असा प्रश्न तेथील नागरिक विचारत आहेत.
वर्षानुवर्षे डोंबिवलीतील रस्त्यांची समस्या जैसे थे आहे. काही सुधारणा होत नाही. रस्त्यांची कामे झाली तरी एक दोन महिनेच रस्ते चांगले राहतात त्यानतंर पुन्हा रस्ते जैसे थे च होतात. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. शिवाय ज्या काँट्रॅक्टरला रस्त्यांचे काम दिले आहे. त्याने जर रस्ता नीट नाही बनवला तर अशा संबंधित काँट्रॅक्टरवर कारवाई होणे गरजेचे आहे. असे नागरिकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे कल्याणडोंबिवली महापालिकेत नव्याने नियुक्त झालेले आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त, अभियंता यांनी याची दखल घ्यावी आणि रस्त्यांची समस्या दूर करावी.