ठाणे

विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा!…

thane – कळव्यातील मनिषा नगर येथील सहकार विद्या प्रसारक मंडळातील पाचवी आणि सहावी मधील तब्बल ३८ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहेत. या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा नगर दत्तवाडी येते सहकार विद्या प्रसारक मंडळाची ही शाळा आहे. राज्य शासनाकडून दिला जाणार पोषण आहार या शाळेतही दिला जातो. मंगळवारी या शाळेत हा पोषण आहार दिला गेला त्यामध्ये भात, डाळ आणि मटकीची उसळ आदीचा समावेश होता. हा आहार देत असतानाच काही विद्यार्थ्यांना अन्नाच्या वासानेच मळमळल्यासारखे झाले. तर काहींनी अन्न खाल्यानंतर उलटी, पोटदुखीचा त्रास सुरु झाला. या विद्यार्थ्यांना तत्काळ महापालिकेच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page