नवी दिल्ली

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना नोटीस…

नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

टीम इंडिया वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात पराभूत होण्यास पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत, अशी टीका राजस्थानमधील प्रचार सभेत करताना राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर अक्षेपार्ह शब्दात टिप्पणी केली होती.

याप्रकरणी भाजपने निवडणूक आयोगात तक्रारही दाखल केली होती. या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे. तसेच याबाबत स्पष्टीकरण द्यावे असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, याप्रकरणी राहुल गांधींना २५ नोव्हेंबर संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page