डोंबिवली
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवली बंद…

Dombivali – जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज (गुरुवार २४ एप्रिल ) सर्व पक्षीयांकडून डोंबिवलीमध्ये बंद पाळण्यात आला आहे.

या हल्ल्यात डोंबिवलीत राहणाऱ्या संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल माने या तीन मावस भावांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
दरम्यान, याच पार्श्ववभूमीवर डोंबिवलीत आज बंद पाळण्यात आला आहे. आणि याला डोंबिवलीकरांचा उत्स्फुर्द प्रतिसाद मिळत आहे.