मुंबई

रोहित पवारांना उच्च न्यायालयाचा दिलासा!…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांना मोठ दिलासा मिळाला आहे. हायकोर्टाने बारामती अॅग्रोवर ६ ऑक्टोबर पर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. 

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बारामती अॅग्रो कंपनीचे २ प्लांट बंद करण्याची नोटीस बजावल्यानंतर याप्रकरणी रोहित पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ६ ऑक्टोबर पर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला आदेश दिले आहेत.

दरम्यान पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page