दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका – अजित पवार…

मुंबई – रत्नागिरीतील बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. भर उन्हातान्हात आंदोलक रस्त्यावर लोळण घेऊन प्रशासनाला विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका. अशी सरकारला विनंती केली आहे. याबाबत अजित पवार यांनी ट्विट केले आहे.
रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस.आंदोलक ठाम असून त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे. राज्यात उष्णतेची प्रचंड लाट आहे.खारघर घटनेत अगोदरच काही लोकांना आपण गमावलं आहे.त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी.
सर्वेक्षण स्थगित करावं, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी चर्चा करावी आणि मार्ग काढावा. पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीनं सर्वेक्षण करू नका, अशी सरकारला विनंती आहे. सर्वेक्षण त्वरित स्थगित करावं, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.