मुंबई

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर…

mumbai – महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. तर त्याचदिवशी संध्याकाळी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होईल. त्याच दिवशी म्हणजेच १२ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीसाठी येत्या २५ जून रोजी निवडणूक आयोगाकडून अधिसचून जारी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना २ जुलैपर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. ३ जुलै रोजी अर्जांची छानणी केली जाईल. तर उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज ५ जुलैपर्यंत मागे घेता येईल. १२ जुलै रोजी या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत यासाठी मतदान करता येईल. १२जुलै रोजीच मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

विधानपरिषदेच्या ११ आमदारांचा कार्यकाळ येत्या २७ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर अन्य व्यक्तींची आमदार म्हणून निवड केली जाईल. २७ जुलै रोजी कार्यकाळ संपणाऱ्या आमदारांमध्ये मनिषा कायंदे, विजय गिरकर, ​​अब्दुल्ला अब्दुल लतीफ खान, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ वजाहत मिर्झा ,डॉ. प्रज्ञा सातव, महादेव जानकर, जयंत प्रभाकर पाटील या ११ आमदारांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page