महाराष्ट्र

नाशिकमध्ये खासगी बसला भीषण आग…

नाशिक – एका खासगी बसला आग लागल्याची घटना घडली असून या अपघातामध्ये काही प्रवासी जखमी झाले आहेत. तर ११ ते १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नाशिक-औरंगाबाद मार्गावरील नांदूरनाका येथे हि घटना घडली. यवतमाळहून मुंबईकडे जात असताना नाशिक- औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर चिंतामणी ट्रॅव्हल्सची बस आणि टँकर यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतला या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली.

दरम्यन घटनेनंतर पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले होते. त्यानंतर जखमींंना बाहेर काढण्यात आले आणि रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page