ठाणे

हरवलेले ५० मोबाईल मूळ मालकांना परत…

ठाणे – खंडणी विरोधी पथकाने हरवलेले २१,५०,०००/- रूपये किंमतीचे एकूण ५० मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत केले.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या ह‌द्दीत नागरीकांचे मोबाईल हरवण्याचे प्रमाण वाढल्याने त्याबाबत पोलीस आयुक्त ठाणे शहर आणि इतर वरिष्ठांनी हरविलेली मालमत्ता (मोबाईल) शोधून ती संबंधित नागरीकांना परत करण्याबाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने खंडणी विरोधी पथकाने https://ceir.gov.in या वेबसाईटच्या आधारे नागरीकांच्या हरविलेल्या मोबाईलची माहिती मिळवून त्याबाबत तांत्रिक तपास करून एकूण २१,५०,०००/- रूपये किंमतीचे एकूण ५० मोबाईल शोधून काढून हस्तगत केले. तसेच हे मोबाईल संबंधित मूळ मालकांना परत केले.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त, शोध २, गुन्हे शाखा, इंद्रजित कार्ले, सहायक पोलीस आयुक्त, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील मपोनि वनिता पाटील, सपोनि श्रीकृष्ण गोरे, सपोनि भूषण कापडणीस, सपोनि सुनिल तारमळे, पोउनि  विजयकुमार राठोड, सपोउनि सुभाष तावडे, सपोउनि कल्याण ढोकणे, सपोउनि संजय बाबर, पोहवा सचिन शिंपी, पोहवा योगीराज कानडे, पोहवा संदिप भोसले, पोहवा संजय राठोड, पोहवा गणेश गुरसाळी, मपोहवा शितल पावसकर, मपोशि मयुरी भोसले, पोशि तानाजी पाटील, पोशि अरविंद शेजवळ, चापोना भगवान हिवरे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button

You cannot copy content of this page