मुंबई

१ जुलैला ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा…

मुंबई – शिवसेना ठाकरे गट येत्या 1 जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व आदित्य ठाकरे करतील अशी घोषणा माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. माजी नगरसेवकांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुंबई मनपाच्या ठेवी म्हणजेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येईल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्यातील महापालिकांच्या निवडणूका पावसाप्रमाणे लांबत चालल्या आहेत. जाब विचारणारे कुणी नाही अशाप्रकारे राज्य सरकारचा उधळपट्टी कारभार सुरु आहे. वारेमाप पैसा उधळला जातोय. G – 20 च्या नावाने लुटालूट सुरु आहे. कोणतेही काम असले तरी बेधडकपणाने महापालिकेचा पैसा वापरला जातोय. माझ्या कानावर असं आलं की आतापर्यंत जवळपास सात ते नऊ हजार कोटी वापरण्यात आले आहेत. हा जनतेचा पैसा आहे आणि या जनतेच्या पैशाची लूट, त्याचा हिशोब जनतेला द्यावाच लागेल. त्या हिशोबाचा जाब विचारण्यासाठी शिवसेना मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे. असे ठाकरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page