डोंबिवली
डोंबिवलीत गोविंदा पथकाने लावले कडक ८ थर…

डोंबिवली – राज्यभरात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. गोविंदाचा उत्साह देखील शिगेला पोहचला आहे. अशातच डोंबिवलीत पहिल्यांदाच ८ थर लावण्यात आले आहेत.

डोंबिवली पश्चिमेत दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य दहीकाला उत्सवात आशीर्वाद दहीहंडी मित्र मंडळाने पहिल्यांदाच ८ थर लावून विक्रम केला आहे. यावेळी त्यांचा उत्साह पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.